आगामी 25  वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प -चंद्रकांत पाटील

81 0

पुणे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. आगामी पंचवीस वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणाऱ्या या अर्थसंकल्पासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवून देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. गुंतवणूक, उत्पादन, शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामविकास, शहरांचा विकास, वैद्यकीय सुविधा अशा सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावा आणि त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांना चालना देऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी महत्त्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले की, डिजीटल रुपया, किसान ड्रोन्स, लष्करी उत्पादनांमध्ये आत्मनिर्भरता वाढविण्यासाठीची तरतूद, ग्रामीण आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक चॅनेल्स वाढविणे, डिजीटल विद्यापीठ, जमिनीची कागदपत्रे डिजिटल स्वरुपात, ई पासपोर्ट, राज्यांच्या विकासासाठी एक लाख कोटींचा निधी हे संकल्प अत्यंत कल्पक आणि उपयुक्त आहेत.

 

Share This News

Related Post

पुण्यातील फोर्थ डायमेन्शन ग्रुपचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Posted by - March 23, 2022 0
पुणे- पुणे येथील आर्किटेक्चर क्षेत्रातील फोर्थ डायमेन्शन ग्रुप मधील फोर्थ डायमेन्शन आर्किटेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड या नामवंत कंपनीने नुकतीच रौप्य महोत्सवी…

कंत्राटी कामगारांचा पुणे महानगरपालिकेसमोर जागरण गोंधळ (व्हिडिओ)

Posted by - February 16, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विभागामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या…

जायकाच्या 550 कोटीच्या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार ? विवेक वेलणकर यांचा सवाल (व्हिडिओ)

Posted by - February 22, 2022 0
पुणे- पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी पुणे महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या…

पुणे विद्यापीठाच्या फी शुल्कात मोठी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Posted by - April 27, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही फी वाढ मागे घ्यावी अन्यथा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!